ओबीसी जनगणना 450 कोटी रुपये खर्च करून होणार’,
सविस्तर.
ओबीसी जनगणनेचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून रेंगाळत चाललेला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतहि खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी भंडारा मध्ये 450 कोटी रुपये खर्च करून ओबीसी जनगणना होणार असल्याचे वक्तव्य यांनी शनिवार रोजी जाहीर केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाच्या मागणी अनुसार ओबीसी जनगणनेसाठी लागणारा निधी 450 कोटी राज्य सरकार देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी साकोली येथे त्यामुळे माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी जनगणनेचा इम्पिरिकल डेटा पूर्णपणे तयार करून ओबीसी आरक्षण दिल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील असा दावा त्यांनी त्यावेळेस केला आहे. नाना पटोले यांनी यावेळेस ओबीसी जनगणनेसाठी मोदी सरकार ओबीसी जनगणनेचा विरोध करत असल्याचा त्यांनी मोदी सरकार वर आरोप केला आहे.
त्याच दरम्यान शुक्रवारी झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नंतर नाना पटोले म्हणाले की , सुप्रीम कोर्टाने 50 टक्के याच्या आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा घालून दिलेले आहे. या सर्व समस्येतून मार्ग काढण्यासाठी इम्पेरिकल डेटा मागासवर्ग आयोगाकडून प्राप्त करून घ्यावा तसेच या इम्पेरिकल डाट्या यासाठी लागणारा आर्थिक तरतूद आयोगाला प्राप्त करून द्यावे