Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2020
यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे तसेच आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठें नुकसान (ativrushti nuksan bharpai maharashtra) या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून शासनाने 24 कोटी रुपयांचे पॅकेज अकोला जिल्ह्यासाठी जाहीर केले आहे जिल्ह्यातील 33 हजार 438 शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे.
सविस्तर. यावर्षी झालेल्या पत्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसकान व पुरामुळे झालेले नुसकान (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) त्याच्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले होते तर अकोला जिल्ह्यासाठी 26 कोटी 78 लाख 73 हजार रुपये मदत जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. तरी चोवीस कोटी पाच लाख 69 हजार रुपये दोन दिवसांपूर्वीच बँकांकडे वळवले आहेत. हा निधी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
यंदा जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी तसेच वेळोवेळी आलेल्या पुरामुळे पिकाचे नुकसान(Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) झाले होते तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान केले होते. या काळात सातही तालुक्यांमध्ये खूप मोठे नुकसान झाले होते आकडेवारी पाहता 41 हजार 631 हेक्टवरती खूप मोठे पिकाचे नुकसान झाले होते. तसेच शेतकऱ्यांच्या हातून मुंग, उळीद, तीळ शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले होते. त्याच्यापाठोपाठ शेतकऱ्यांच्यी आशा सोयाबीनच्या पिकांकडे होती. तरी सोयाबीनचे ठीक सुद्धा शेतकऱ्यांना काहीच झाले नाहीत सोयाबीन मधून शेतकऱ्यांच्या लावलेला खर्चसुद्धा वसूल झालेला नाही.
नक्की वाचा – घरकुल योजना-Gharkul yojana list 2020
तसेच शेतकरी कपाशी पिका कडे डोळे लावून बसलेले होते व कपाशी पिकावर ती एकदमच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे कपाशी पिकातही खूप मोठे शेतकऱ्यांचे नुसकान झाले. शेतकऱ्यांच्या अशा स्थितीमध्ये शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजचा निधी अकोला जिल्ह्याच्या वाट्याला 26 कोटी 78 लाख रुपये आले आहेत.
कोणत्या तालुक्याला किती निधी मिळाला.
1) अकोला तालुक्यासाठी पाच कोटी 66 लाख रुपये 3हजार.2)
अकोट तालुक्यासाठी पाच कोटी 18 लाख रुपये 22 हजार.3) बाळापुर तालुक्यासाठी सात कोटी 27 लाख 78 हजार.4) बार्शीटाकळी तालुक्यासाठी एक कोटी 42 लाख 95 हजार रुपये.5) पातुर तालुक्यासाठी 1 कोटी 62 लाख 27 हजार रुपये.6) मुर्तीजापुर तालुक्यासाठी दोन कोटी 43 लाख 41 हजार रुपये.7) तेल्हारा तालुक्यासाठी तीन कोटी 18 लाख सात हजार रुपये.
तरी सर्व निधी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना देण्यात आलेला आहे हा निधी जिल्ह्यातील 33 हजार 438 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात लवकरच जमा होणार आहे. तसेच जास्त संख्या असलेला तालुका बाळापूर मध्ये 7 हजार 134 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांना 4464 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मुर्तीजापुर तालुक्यातील तीन हजार 240 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
बार्शीटाकळी तालुक्यांमध्ये तीन हजार 643 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. अकोट तालुक्यांमध्ये 4865 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्याला तालुक्यांमध्ये पाच हजार 136 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. अकोला तालुक्यांमध्ये चार हजार 156 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. प्रशासकीय अधिकार्यांकडून लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.