Sharad Pawar Gram Samrudhi Yojana 2021
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या स्वयम् योजनेतून sharad pawar gram samrudhi yojana. राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
या बैठकीच्या वेळी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते.
या कामातून सामाजिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana राबवण्यात येईल. असे बैठकीमध्ये बोलतांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले.
प्रत्येक गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न असून तर प्रत्येक शेतकरी या योजनेतून समृद्ध होईल. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana तून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला गाय, व महेश याकरता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेट बांधणे, कुकुट पालन शेड बांधणी, तसेच कंपोस्टिंग खत तयार करण्यासाठी या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
नक्की वाचा – Shetkari Kisan card- credit card information in Marathi 2021
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक व सार्वजनिक कामे होतील त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. व कामासाठी होणारे स्थलांतर थांबवणे. आता उपरोक्त कामासाठी आवश्यक असणारे 60:40 कुशल-अकुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी मोग्रारोह्याच्या विविध योजनेच्या जसे की शेततळे, वृक्षलागवड, शोषखड्डे, फळबाग, लागवड इत्यादी खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे योजनांच्या स्वयम् योजनेतून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध लखपती होतील असा Sharad Pawar Gram Samrudhi Yojana उद्देश आहे.
तसेच शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैश याकरीता पक्का गोठा बांधणी??
जनावरांसाठी गोठे जागाही ओबडधोबड आणि खास खेळते भरलेली असते तसेच ती स्वच्छ नसल्याने जनावरांना विविध आजार होतात. या योजनेतून पक्का गोठा बांधल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेती उपयुक्त साठी शेणखत तसेच मूत्र गोळा करता येणार. तसेच जनावरांसाठी खाण्यासाठी गोठ्यामध्ये गव्हाण बांधणे मूत्र सयच टाके बांधणे.
लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. यासाठी 6 गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 या करीता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील.
:- शेतकऱ्यांना मिळणार आता शेळीपालनासाठी व शेळी साठी अनुदान.
तसेच शेतकऱ्यांना शेळीच्या गोठ्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेता येत नाही. तर सरकारकडून दहा शेळ्या विकत घेण्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. याचा फायदा भूमिहीन शेतकऱ्यांना होणार आहे तसेच शेळी शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे.
:- ग्रामीण भागांमध्ये कुकुटपालन शेड बांधणे.
कुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणार्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
:- कंपोस्टिंग खत तयार करणे.
शेतकऱ्यांनी जर कंपोस्ट खत तयार केले तर आरोग्य सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते सेंद्रिय पदार्थांत सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरता दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. तर या योजनेसाठी या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार537 रुपये खर्च अपेक्षित आहे.